औरंगाबाद मध्ये एकाने ११ जणांना प्रत्येकी २००० रुपये घेऊन माजून म्हणून तिसऱ्या ठेकेदाराला विकले ; त्याने पंधरा दिवस त्या ११ मजुरांना फुकटात १२-१२ तास राबवले ; रात्री पळून जाऊ नये म्हणून बांधून ठेवले ; जिवंत राहावेत आणि काम करावेत म्हणून फक्त दोन वेळचे जेवन दिले इत्यादी आता प्रकरण पोलिसांकडे आहे ; ते काय कारवाई करतील ती करतील ?
पण याच दोन दिवसात इंटरनॅशनल लेबर ऑर्ग (आयएलओ ) आणि इतर संस्थंचा जगातील अजूनही (२०२३ मध्ये !) सुरु असणाऱ्या गुलामगिरीबद्दल आकडेवारी अहवाल आला आहे
त्यांच्या आकडेवारी प्रमाणे आज जगात ५ कोटी व्यक्तींना गुलाम म्हणून राबवले गेले आहे ; ज्यात सव्वा कोटी लहान मुले आहेत तर सव्वा दोन कोटी तरुण स्त्रिया आहेत ; गुलामासारखे वागवणे हि वेगळी गोष्ट ; फिजिकली मजुराला कंट्रोल करणे / बांधून ठेवणे अशा अर्थाने
नेपाळ / भारत / बांगलादेश यांची नावे पहिल्या दहा देशात आहेत ; या ५ कोटींपैकी भारतात १ कोटी पेक्षा जास्त व्यक्तींना जबरदस्तीने गुलाम म्हणून ठेवले गेले आहे.





































