
परभणी (दि.०५) महाराष्ट्र राज्याच्या 14 व्या विधानसभेच्या (2019 ते 2024) कार्यकाळात अल्पसंख्यांक समाजाच्या हितांशी संबंधित मुद्द्यांवर गंभीर दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.एकूण 5921 प्रश्नांमध्ये केवळ 9 प्रश्न अल्पसंख्यांकांशी संबंधित होते, म्हणजेच केवळ 0.15 टक्के प्रश्नच या घटकाच्या बाबतीत उपस्थित करण्यात आले.
हा आकडा अल्पसंख्यांकांच्या सामाजिक,आर्थिक आणि राजकीय दुर्दशेचा आरसा आहे. या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे अपुरे लक्ष असल्याचे स्पष्ट होते. संपर्क’ या संस्थेनं केलेल्या पाहणीनुसार, 14 व्या विधानसभेत म्हणजेच ( 2019 ते 2024 ) 5 वर्षांत विधानसभेत 5921 प्रश्न विचारण्यात आले. त्यातले केवळ 9 प्रश्न अल्पसंख्याकांविषयी होते.
